Tuesday 26 November 2019

भारतीय संविधान

*भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी.*

*दीपक मोहिते*

 देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा करण्यात येत आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हें. १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.या निमित्ताने देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे.या निमित्तानं जाणून घेऊया संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...
१) २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? -२६ नोव्हें. हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कारण २६ नोव्हें. १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस,या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३) कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४) संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली.जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,एन.गोपालस्वामी अय्यंगार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,के.एम.मुन्शी,सय्यद मोहमद सादुल्लाह,बी.एल. मित्तर,डी.पी.खैतान,अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
 ५) संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसें.१९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते.त्यानंतर ११ डिसे.१९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.
६) संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान समितीच्या सदस्यांची संख्या २९२ झाली.समितीच्या ११ बैठका झाल्या.त्या १६५ दिवस चालल्या.समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या.त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय.संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की,स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय,राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता,समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे.संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही
आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.समता,बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील,करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका,१२अनुसुची,२५ भाग,४४८ कलमे,५ परिशिष्टे आहेत.आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला.भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
९) संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते.पण संविधान हे हस्तलिखीत असावं,अशी नेहरुंची इच्छा होती.बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने त्यांना जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.
maharashtra times constiution
१०) संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवली आहे.

No comments:

Post a Comment